Pages
Friday, March 2, 2012
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते.
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते.......
मराठी अस्मीतेवर हल्ला होण्यापूर्वीच
गडगडतो तो राज गड ,
हल्ल्यासाठी तयार होतो तो प्रतापगड,
आणि, ढाल घेऊन उभा राहतो तो तोरणा........
अरे मी, मी मराठी माणूस
जागा झालोय,
आठवूनी बाजीची पावनखिडं,
हातात तलवार घेऊन, दुश्मनांची वाट पाहतोय.......
अरे मी, मी मराठी माणूस
भुकेला झालोय,
आता परप्रातीयांची काही खैर नाही,
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते........
अरे मी, मी मराठी माणूस
अंगात माझ्या मराठयाचं रक्तं,
शपथ शिवरायांची घेऊन,
उभा करतो आज महाराष्ट्राचा तक्तं......
अरे मी, मी मराठी माणूस
आवाज उठवतोय, अत्याचारावरच नाही तर,
रक्त भ्रष्टाचारी मानसाचं साडूंन
भविष्य मराठय़ाचं जपतोय........
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते........
!!! जय महाराष्ट्र !!
!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment